आमचा देश आमचे संविधान
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - श्रीधर बच्छाव (पाटील )कवी /लेखक /समीक्षकबालाजी नगर सिल्लोड

२६ नोव्हेंबर संविधान दिन
आमची शान आमचा अभिमान
आमचा देश आमचे संविधान
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरितून भारत देशाला स्वातंत्र मिळाले सगळी कडे आनंदी आनंद झाला भारत देशाचा कारभार इंग्रजांच्या विचारसरनी नुसार न चालवता भारतीयांच्या नियमानुसार चालवण्यासाठी संविधान निर्मितीला १९४६ पासून सुरवात झाली .संविधान म्हणजे देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी लिखित नियमावलीचा दस्तावेज म्हणजे संविधान होय .आणि स्वातंत्र्य भारताचे संविधान लिहिण्यासाठी संविधान समितिची स्थापना करण्यात आली ही संविधान समिति संविधान सभा म्हणून ओळखली जाते .या संविधान सभेत एकूण २९९ सदस्य होते संविधान समितेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर मसुदा समितेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आले व सर्व अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेत संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू ….सरदार वल्लभभाई पटेल ….मौलाना अब्दुल आझाद ….सरोजिनी नायडू ….जे .बी .क्रुपलानी …राजकुमारी अम्रुता कौर ….दुर्गाबाईं देशमुख ….हंसांबेन मेहता इत्यादी सदस्य संविधान सभेत होते .भारताच्या संविधान मध्ये २२ भाग ३९५ कलमे व ८ परिशिष्ट आहेत .संविधानात उद्देशिका ..प्रस्तावना ..सार्वभौमत्व याचा समावेश असून संविधानाने तीन सूची तयार केलेल्या आहेत (१)संघसूची– यात ९७ विषय (२) राज्यसूची यात — ६६ विषय (३) समवर्तीसूची यात — ४७ विषय
…संविधान लिहिण्यासाठी २ वर्ष ..११ महीने व १७ दिवस इतका कालावधी लागला
….२६नोव्हेंबर रोजी संविधान सभेने संविधान स्वीकार करून मान्यता दिली म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन “म्हणून साजरा करण्यात येतो ……व २६ जानेवारी पासून भारतीय संविधान अमलात येऊन संविधान नुसार भारत देशाचा कारभार सुरू होऊन खऱ्या अर्थाने जनतेच्या म्हणजेच प्रजेच्या हाती सत्ता आली म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो ……..॥॥
जयहिंद !जय भारत.
आपणास व आपल्या परिवारास संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – श्रीधर बच्छाव (पाटील )कवी /लेखक /समीक्षकबालाजी नगर सिल्लोड
