
निवडणूका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अन्यथा टोकाचे पाऊल उचलणार….
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क (वृत्तसंस्था)
विधानसभेचे निकाल जनतेने नाकारले असुन इव्हिएमचा घोळ करुन लागलेल्या निकालाच्या विरोधात न्यायलयीन लढाई सोबतच जनतेच्या तिव्र भावना निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोगाचा घेराव घालून रस्त्यावर उतरणार. निवडणूका बॅलेट पेपर वरच झाले पाहिजे अन्यथा टोकाचे पाऊल उचलणार. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा इशारा देण्यात आला.
