राज्य
अलर्ट ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांवर पावसाचं सावट
काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आल आहे.

💥 अलर्ट ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांवर पावसाचं सावट
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
💁🏻♀️ महाराष्ट्राच्या हवामानात सतत चढ-उतार होत आहेत. अशातच आता अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असून हलका ते मध्यम पाऊस बरसत आहे.
🌧️ अशातच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पूढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
🟡 तर राज्यातील औरंगाबाद, कोल्हापूर, महाबळेश्वर, परभणी, सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
💥 त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पिकाची योग्य काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आल आहे.
