शैक्षणिक

एकविस वर्षानंतर वर्ग मित्रांची भरली शाळा

उपस्थित मुलींना जावई आमच्या मुलाप्रमाणे आहेत त्यांना त्रास दिला.तर सोडणार नाही असा सज्जड इशारा सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव देशमुख यांनी दिला.

एकविस वर्षानंतर वर्ग मित्रांची भरली शाळा

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज बजाजनगर/प्रतिनिधी:- राजू जंगले 

रांजणगाव पोळ येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालयाचे २००३-२००४ बॅचमध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्ग मित्रांनी रविवार १५ डिसेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात पुन्हा एकत्र येत शाळा भरवली. रांजणगाव पोळ येथील विद्यालयात २००३-२००४ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा भरवण्याचे ठरवले याकरिता सचिन बोडखे अर्जुन कापसे योगिता जाधव अनिल शेलार आणि अरविंद राऊत या वर्ग मित्रांनी एक व्हाट्सअप ग्रुप बनवून सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना एकत्र जमवले. रविवार 15 डिसेंबर रोजी वर्गमित्रांची शाळा भरण्याचा निर्णय घेत तो लगेचच आमलातही आणला. यावेळी त्या काळाचे शिक्षक सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम नेमाने यांच्या अध्यक्षतेखाली व स्वामी ज्ञानानंद गिरीजी महाराज, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव देशमुख, मुख्याध्यापक विलास जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी बोडखे पाटील इंग्रजीचे शिक्षक एम एल कराड, बाबासाहेब बारगळ,केंद्रप्रमुख विठ्ठल नरोडे, अशोक शिंदे, रामेश्वर शेळके,तुकाराम शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार १५ डिसेंबर रोजी शाळा भरविण्यात आली. नेहमीप्रमाणे शाळेची घंटा वाजून राष्ट्रगीत घेत हजेरी घेऊन वर्ग भरविण्यात आला. यावेळी सर्व वर्गमित्रांनी आपल्या कुटुंबासह हजेरी लावली. याप्रसंगी सर्व वर्ग मित्रांनी आपल्या कुटुंबाचा परिचय देत करत सध्या करत असलेल्या कामासंदर्भात एकमेकांशी संवाद साधला तसेच एकमेकांची सुखदुःख जाणून घेतले.विद्यार्थ्यांनी आपल्या संघर्षाचा काळ आपल्या गुरुजना समोर मांडताना आपल्या शिकवणीतूनच आम्ही त्यावर कशी मात केली हे आवर्जून सांगितले. यावेळी गुरुजनांनी विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद देत यापुढेही आपण एकमेकांच्या संपर्कात राहावे व एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सचिन बोडखे यांनी केले सूत्रसंचालन अनिल शेलार यांनी केले आभार शालेय समिती अध्यक्ष शिवाजी बोडखे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या अर्जुन कापसे अरविंद राऊत अन्सार शेख यांच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शाळेचा समारोप भोजनाने करण्यात आला. चौकट यावेळी सोबत असलेल्या काही वर्ग मित्र तसेच काही शिक्षक हयात नसल्याने त्या सर्वांना सर्व विद्यार्थी व उपस्थित गुरुजनांनी दोन मिनिटं जागेवर उभा राहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संपूर्ण भावनिक वातावरण झाले होते. मुली व जावयांच्या शिक्षकासमोर तक्रारी यावेळी अनेक मुलींनी आपल्या वर्ग शिक्षकाकडे आपल्या पतीच्या तक्रारी केल्या. तेव्हा वर्ग शिक्षकांनी उपस्थित जावयांना या आमच्या मुली आहे त्यांना त्रास दिलेला खपवून घेणार नाही असा दम दिला. तर यावेळी काही जावयांनी वर्ग शिक्षकासमोर त्यांच्या मुलींच्या तक्रारीचा पाढाच वाचला. त्यावेळी वर्ग शिक्षकांनी उपस्थित मुलींना जावई आमच्या मुलाप्रमाणे आहेत त्यांना त्रास दिला.तर सोडणार नाही असा सज्जड इशारा सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव देशमुख यांनी दिला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close