
नागपूर पेटलं! औरंगजेबाच्या कबरीचा वाद, जमावाकडून जाळपोळ; पोलिसांवर दगडफेक
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था नागपूर
उपराजधानी नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून तणाव निर्माण झाला. नागपूरच्या महाल परिसरात संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. जमावाने केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीत अनेक वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूर पेटलं आहे. नागपूरच्या महाल परिसरात जमावाकडून जाळपोळ करण्यात आली आहे. यावेळी जमावाला नियंत्रित कऱण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे.
जमावाने केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीत अनेक वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. पररिस्थिती हाताळण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे
