
मोठी बातमी ! वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; मोदींच्या बैठकीतून पाकवर स्ट्राईक
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था नवी दिल्ली
नवी दिल्लीः पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सीसीएस म्हणजे कॅबिनेट सुरक्षा सेक्युरिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काश्मीरमधील दहशवाद आणि पाकिस्तान या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली असून 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील या बैठकीला हजर होते. या बैठकीत वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेऊन घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानुसार, पाकिस्तानची पूर्णतः कोंडी करण्यात आली आहे.
