
😎 नागरिकांनो काळजी घ्या! सूर्य आग ओकणार
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
💥 उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच देशभरात आता मार्च ते मे दरम्यान उष्णता अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
🚨 महाराष्ट्रात देखील उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
🌞 मार्चच्या सुरुवातीच्या दिवसात राज्यातील अंतर्गत भागात 2-3 अंशांनी तापमान वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
💁🏻♀️ उन्हाळ्यात ‘या’ गोष्टींची काळजी घ्या :
हलके, हलक्या रंगाचे, सैल सुती कपडे घालावेत.
उन्हात बाहेर जाताना गॉगल, छत्री/टोपी, व चप्पल वापरावी.
पुरेसं आणि शक्य तितक्या वेळा पाणी प्यावे
हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे
