
संविधान म्हणजे आमचा आत्मा
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
“साहित्यिक -श्रीधर बच्छाव पूर्णा कावेरी शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय व रामेश्वर इंग्लिश स्कूल क्षीरसागर या शाळेत २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला
….कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉ .आशीष पाटील सर व प्रमुख पाहुणे डॉ .सीमा पाटील आदरणीय अजिंक्य सर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ .राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली.
व्यासपीठावर मुख्याध्यापिका अरुणा सोनवने प्रिन्सिपल जगदीश कापुरे यांची उपस्थिति होती.
“लोकशाही आणि संविधान “या विषयावर विचार पुष्प गुंफताना प्रसिद्ध साहित्यिक “श्रीधर बच्छाव” म्हणालेत की, आपले भारतीय संविधान सर्व जगामध्ये सर्व श्रेष्ठ आहे संविधानाने सर्वाना जाती धर्म पंथ हा भेदभाव न करता सर्वाना समान न्याय हक्क व अधिकार प्रदान केलेले आहेत संविधान समितिने २ वर्ष ११महीने व १७ दिवस संविधान समितीने सखोल अभ्यास करून २६ नोव्हेंबर या दिवशी संविधान समितिने संविधान स्वीकार केले म्हणून २६नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो व या संविधान नुसार देशाचा राज्यकारभार २६ जानेवारी अंमलात आला खऱ्या अर्थाने या दिवसापासून जनतेच्या म्हणजेच प्रजेच्या हाती सत्ता आली म्हणुन २६जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणुन साजरा केला जातो असे प्रतिपादन साहित्यिक श्रीधर यांनी केले शेवटी “संविधान” ही ही कविता सादर करून कवितेतून संविधानची माहिती पटवून दिले
…कार्यक्रमाला शुभम कचरे. किशोर आरके.दीपक उचित .नितीन दांडगे. प्रदीप कूदळे सोमीनाथ मोरे .प्रदीप शेळके .अनिता रोडगे गंगा सागर मुटकुळे.अर्चना बोरडे .राणी जगताप इत्यादि कर्मचारी हजर होते
सूत्रसंचानल भूषण पिताबंरे यांनी तर आभार प्रदर्शन अमोल राऊत यांनी मानले
