
शिक्षकांची दर तीन वर्षांनी परीक्षा घेतली पाहिजे; सुधा मूर्ती यांची सूचना
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
“शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. जर शिक्षक चांगले नसतील तर शिक्षण व्यवस्था सुधारू शकत नाही. फक्त शाळेच्या इमारती सुधारून काहीही होणार नाही, चांगले शिक्षक देखील आवश्यक आहेत. चांगले शिक्षक असल्याशिवाय केवळ चांगल्या शाळा इमारती बांधल्याने शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही.” असे सुधा मूर्ती म्हणल्या.
शिक्षक एकदा बीए, एमए किंवा पीएचडी पूर्ण करून अध्यापन सुरू करतो की, निवृत्तीपर्यंत त्यांच्यासाठी कोणतीही परीक्षा नसते. ही परिस्थिती योग्य नाही. दर तीन वर्षांनी शिक्षकांसाठी, विशेषतः प्राथमिक स्तरावर शिकवणाऱ्यांसाठी, एक नवीन प्रशिक्षण आणि परीक्षा असावी, अशी शिफारस संसदेत शिक्षण मंत्रालयाच्या कामावर चर्चा करताना सुधा मूर्ती यांनी केली आहे.
मूर्ती पुढे म्हणण्यात की, “शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. जर शिक्षक चांगले नसतील तर शिक्षण व्यवस्था सुधारू शकत नाही. फक्त शाळेच्या इमारती सुधारून काहीही होणार नाही, चांगले शिक्षक देखील आवश्यक आहेत. चांगले शिक्षक असल्याशिवाय केवळ चांगल्या शाळा इमारती बांधल्याने शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही. शिक्षकांना केवळ त्यांच्या पदवींनीच नव्हे तर त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती, समजावून सांगण्याची पद्धत आणि वर्तनानेही शिक्षण व्यवस्था मजबूत करावी लागेल.”
मूर्ती म्हणाल्या, ” शिक्षकांसाठी अनेक प्रशिक्षण सत्रे आहेत, परंतु त्यामध्ये परीक्षा नाहीत. म्हणून दर तीन वर्षांनी शिक्षकांची परीक्षा घेतली पाहिजे, ज्यामध्ये नवीन अध्यापन तंत्रांचा समावेश असावा.जर एखाद्या व्यक्तीला चांगला शिक्षक व्हायचे असेल तर त्याला कठोर प्रशिक्षण आणि परीक्षा द्याव्या लागतात.”
राष्ट्रवादी-एससीपी खासदार फौजिया खान यांनीही सुधा मूर्ती यांच्या सूचनेचे समर्थन केले आणि सरकारच्या उक्ती आणि कृतीत खूप फरक असल्याचे सांगितले.
