
खंडोबा मंदिरात शेकडो वर्षांपासून होतोय जय मल्हारचा गजर…!!
साक्षर इंडिया लाईव्ह छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था)
जय मल्हारी… देव मार्तड. माझा खंडोबा म्हणत गेले असंख्य वर्षांपासून शहरातील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी साजरी करण्याची परंपरा आहे. ही परंपरा शेकडो वर्षांपासून जोपासली जाते. मराठवाड्यातले प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाणारे शहरातील सातारा खंडोबा मंदिराला शेकडो वर्षांपासूनचा इतिहास लाभलेला आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधकाम झाले आहे. आजही खंडोबा मंदिरात मोठ्या उत्साहात पारंपरिकता जपली जाते. आजही असंख्य भाविक दर्शनासाठी चंपाषष्ठी पारंपरिक पद्धतीने साजरी करत असल्याची माहिती मंदिराचे सचिव साहेबराव पळसकर यांनी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजशी बोलतांना दिली. चंपाषष्ठीला सातारा खंडोबा मंदिरात यात्रा भरविण्याची परंपरा आहे. तसेच वाघ्या मुरळी यांची देखील हजेरी लावली जाते. याशिवाय घटस्थापना करून पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. रोडगा, वांगे, कांद्याच्या पातीचे भरीताचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा देखील जोपासली जाते. चंपाषष्ठीच्या निमित्ताने यात्रेला शहरासह अहमदनगर, जालना, लातूर सह आदी ठिकाणाहून दूर दुरून असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. जय मल्हारच्या गजरात पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. ही परंपरा सातशे वर्षांपासून सातत्याने जोपासली जात आहे. चंपाषष्ठीला भाविकांच्या उपस्थितीत पूजा करून पालखी खंडोबा मंदिर ते जहागीरदार यांच्या वाड्यापर्यंत काढण्याची परंपरा जोपासली जाते. लघुरुद्राभिषेक करून पुन्हा पालखी मंदिरात आणली जाते. चंपाषष्ठीला तळी भरून पचपदी आरती केली जाते. वांग्याचे भरीत, रोडम्याचा नैवेद्य दाखविला जातो. असंख्य भाविक देखील नैवेद्य दाखवून पारंपरिक पद्धतीने पूजा करतात. पूर्वी भंडारा उधळण करत नव्हते. परंतु हळूहळू भंडारा उधळण्याची परंपरा जोपासली जाऊ लागली, दरवर्षी किमान ५० किलो भंडारा भाविकांकडून उचळला जातो. नवीन लग्न झालेले वधू, दर पूजा करण्यासाठी येतात. जागरण गोंधळ देखील केला जातो. ही परंपरा यंदाही जोपासली जात आसून भाविकांच्या सेवेसाठी विशेष नियोजन मंदिराच्या वतीने करण्यात येत असते. यावर्षी देखील ही परंपरा कायम ठेवली आहे. यासाठी मंदिराचे अध्यक्ष रमेश चोपडे, सचिव साहेबराव पळसकर सह आदीच्या वतीने सहकार्य केले जात आहे.
अशी सांगितली जाते आख्यायिका
सातारा परिसरातील खंडोबा मंदिर सातशे वर्षापासूनचे आहे. जहागीरदार होते. नारायण दीक्षित नावाचे जहागीरदार होते. सातारा परिसरातील कडेपठार डोगरावर असलेल्या खंडोबाचे मंदिर आहे. जहागीरदार या मंदिरात पाई पूजा करण्यासाठी जात होते. तारुण्यात दर्शनासाठी आणि पूजा करण्यासाठी ते सातत्याने जात होते. परंतु म्हतारपणामुळे त्यांना दर्शनासाठी जाता येईना. त्यांनी खंडोबाला प्रार्थना केली देवा आता मी थकलो, मला पूजा करण्यासाठी येता येईना अशी खंत व्यक्त केली. मात्र खंडोबाने साक्षात दर्शन दिले. असे आख्यायिकात सांगितली जाते. आणि त्यांनी त्याचवेळी सातारा मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून चंपाषष्ठीला सुरुवात झाली अशी आख्यायिका पूर्वजांकडून सांगितली आते. तेव्हापासून या मंदिरात घटस्थापना करून चंपाषष्ठीला यात्रा भरविण्याची परंपरा आहे.
मंदिराचा होणार विकास साहेबराव पळसकर
खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. शासनाच्या वतीने १० कोटी रुपयाचा निधी मिळाला असून त्यात दगडी बांधकाम, सभा मंडप, दीपमाळ आदी विकास यात केला जाणार आहे. सध्या मंदिराचे काम केले जात आहे. परंतु आता चंपाषष्ठीची यात्रा महोत्सव सुरू आहे. त्यानंतर राहिलेले कामे केले जाणार असल्याची माहिती मंदिराचे सचिव साहेबराव पळसकर यांनी दिली.
