बिबट्याने पाडला गाईचा फडशा शेतकऱ्यांला तात्काळ मदत द्यावी
शेतात वावरताना खबरदारी घेण्याचे आव्हान वनपाल अलका राठोड यांनी केले आहे

बिबट्याने पाडला गाईचा फडशा शेतकऱ्यांला तात्काळ मदत द्यावी
बालानगर/ प्रतिनिधी:
पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे येथे गेले चार ते पाच महिन्यांपासून बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी यांना कळविले असता वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याने गायचा फडशा पाडला आहे असे त्यांनी सांगितले.
डोणगाव बाळानगर परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाने बिबट्याचा पिंजरा आणून बंदोबस्त करावा असे मागणी केली आहे. परंतु अद्याप पर्यंत बिबट्याला पकडण्यात वनपरिक्षेत्राला यश आले नाही. अशातच दि. ८ जानेवारी २५ वार बुधवार रोजी शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांच्या मालकीच्या शेतात गट नंबर १६३ यांच्या शेतातील गाय गोठ्यात वन्य प्राणी बिबट्याने अंदाजे रात्री दोन ते तीन वाजता बिबट्याने गायचा फडशा पाडला सदर घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे हि नुकसान भरपाई शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांना तात्काळ मदत द्यावे अशी मागणी शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे तसेच परिसरातील शेतकरी यांनी केली आहे.परिसरातील या महिन्यातील दुसरी घटना असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोणगाव परिसराला डोंगराचा भाग आहे. वन्य प्राणी यांना आजूबाजूला पाझर तलाव असल्याने मुबलक पाणी आहे यामुळेच या परिसरात नेहमी बिबट्यांचा वावर असतो. अनेक वेळा गुरे, शेळ्या, मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले आहे. रात्री मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हला करून गाय जागीच ठार करून फडशा पाडला आहे. सकाळी शेतकरी उठल्यानंतर शेतात गेले असता दिसता रक्ताचे थारोळे दिसले व गाईचा फडशा पडल्याचा दिसले व बिबट्याच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले. ठशांच्या मागावरून तपास करत काही अंतरावर झुडपात शरीराचे लचके तोडलेले गाय निदर्शनास पडले दिसले. त्यामुळे बिबट्याचा अजूनही परिसरात वावर असल्याची खात्री झाली. शेतकरी यांनी वनविभागाला माहिती कळविली आहे. शेतकरी यांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी अलका राठोड स्वता घटनास्थळी दाखल झाल्या होत्या व त्यांच्या मार्गदर्शना- खाली कर्मचारी वनपाल पैठण अलका राठोड व वनरक्षक प्रशांत निकाळजे, वनरक्षक प्रभू चोरमारे, अमिता शेख ,अहिरे मामा, पशुप्रवेशक डॉ. विलास केदार बालानगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सदर घटनेमुळे सध्या रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात राहणारे शेतकरी भयभीत झाले आहे त्यामुळे वनविभागाने याची दखल घेण्याची व पिंजरा आणून बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे
यांनी वन विभागाचे अधिकारी अलका राठोड यांच्याकडे केली आहे.
डोणगाव शिवारातील शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांच्या गाईवर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात गाईचा अक्षरता फडशा पडला आहे .त्यामुळे बिबट्याचा अजूनही परिसरात वावर असल्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी शेतात वावरताना खबरदारी घेण्याचे आव्हान वनपाल अलका राठोड यांनी केले आहे
