राज्यशैक्षणिक

राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय!

स्पर्धात्मक परीक्षांसाठी अधिक चांगली तयारी करता येईल आणि शिक्षणातील गुणवत्ता वाढेल. 

राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय!

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क 

गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, राज्य सरकारने राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासूनच हा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री  भुसे यांनी विधानसभेत ही घोषणा केली..

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्यात आले. राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार CBSE अभ्यासक्रमाच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून, १ एप्रिलपासून नवीन सत्राची सुरुवात होणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाचा लाभ मिळेल, स्पर्धात्मक परीक्षांसाठी अधिक चांगली तयारी करता येईल आणि शिक्षणातील गुणवत्ता वाढेल. 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close