Travel

मोठी बातमी: जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या; जळगावात 11 जणांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू!!

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

💥 मोठी बातमी: जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या; जळगावात 11 जणांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू!!

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था 

💁‍♂️ जळगावहून मुंबईकडे येत असलेल्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी गाडीमधून उड्या मारल्या. मात्र, दुर्दैवाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडलं.

ℹ️ घटनेचा आढावा:

▪️ मृत्यू : आतापर्यंत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू
▪️ गंभीर जखमी : 4 जण गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल
▪️ किरकोळ जखमी : 7 जण किरकोळ जखमी

🤔 घटनेचा तपशील : ही घटना गैरसमजामुळे घडली आहे. आग लागल्याची अफवा ऐकून प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने त्यांना चिरडलं.

🤝 मदतकार्य : घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना पाचोऱ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

🗣️ प्रशासनाची प्रतिक्रिया : जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारला लवकरात लवकर मदत पुरविण्याची विनंती केली आहे.

आता काय? मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून घटनास्थळी शोध आणि मदतकार्य जोरात सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close