
आखिल भारतीय बळीराजा संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व अतुल सावे यांच्या उपस्थितीत कौतुक सोहळा
विद्यार्थ्यांसोबत पालकांचा होणार सत्कार; करिअर मार्गदर्शनाचाही समावेश
आखिल भारतीय बळीराजा संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य कौतुक सोहळा
साक्षर इंडिया लाईव्ह छत्रपती संभाजीनग प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे छत्रपती संभाजीनगर
– कष्टकरी कामगार व शेतकऱ्यांचा बुलंद आवाज ठरलेल्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उत्तम यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य कौतुक सोहळा शुक्रवार, दिनांक ३० मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आर्यभट्ट सभागृह, जे.एन.ई.सी. (एम.जी.एम.) महाविद्यालय, सिडको, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कौतुक समारंभात विद्यार्थ्यांच्या यशामागील आईवडिलांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांसोबत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. ना. माणिकराव कोकाटे आणि दुग्ध व्यवसाय व ओबीसी कल्याण मंत्री मा. ना. अतुलजी सावे यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात दहावी-बारावीनंतरच्या शिक्षण व करिअर संधींबाबत मार्गदर्शन सत्रही आयोजित करण्यात आले आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व व्यवसायिक संधींबद्दल माहिती दिली जाणार आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डक पाटील व प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह कार्यक्रमात वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.या कार्यक्रमासाठी प्रदेशसचिव के. गाडेकर, मराठवाडा अध्यक्ष प्रभाकर भुसारे, महिला प्रदेश अध्यक्ष अनिता पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष शोभा वाकळे, संघटक लक्ष्मण टेळे जिल्हाअध्यक्ष आबासाहेब भोसले,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील तांबे ,तसेच जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कौतुक सोहळ्याच्या आयोजनामागील हेतू म्हणजे ग्रामीण व सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन करणे व त्यांच्या यशामागील मेहनतीची जाणीव समाजापर्यंत पोहोचवणे, असे आयोजकांनी सांगितले.
