सामाजिक

आजपासून बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून छत्रपती शिवराय विचार प्रबोधन – प्रसारण अभियानास सुरवात

सेवेकऱ्यांनी सदरील ऐतिहासिक क्षणांमध्ये सहभागी होऊन शिव विचारांचा जागर घराघरात पोहचवण्याचे आवाहन नियोजन प्रतिनिधी यांनी केले आहे.

आजपासून बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून छत्रपती शिवराय विचार प्रबोधन – प्रसारण अभियानास सुरवात

उपक्रमाच्या सुरवातीला राबवली ऐतिहासिक श्री भांगशी माता गडावर स्वच्छता मोहीम

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी:राजू जंगले बजाजनगर

परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने व आदरणीय नितीनभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दिनांक ९ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत शिव विचारांचा जागर व दुर्गसंवर्धन अभियान राबविण्यात येणार आहे. 

आजच्या बाल व तरूण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथा, गड-किल्ल्याची ओळख तसेच संवर्धन होणे गरजेचे आहे तसेच भावी पिढी व्यभिचारी, व्यसनी होऊ नये या अनुषंगाने शिव विचारांचे बाळकडू मिळणे काळाची गरज बनली आहे. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून आगळा वेगळा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर जवळील ऐतिहासिक शरणापूर येथील श्री भांगशी माता गडावर युवकांनी जाऊन स्वच्छता अभियान राबविले. सकाळी ८.०० वाजता अभियानास सुरवात होऊन दुपारी ११. ३० वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. श्री भांगशी माता गडाचे महंत श्री स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांनी उपक्रमाचे कौतुक करत युवकांना गडाविषयी माहिती दिली व महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच परमपूज्य गुरुमाऊलींच्या २०% अध्यात्म आणि ८०% समाजकार्य या कार्यपद्धतीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. १९ फेब्रुवारी पर्यंत विविध उपक्रम बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत. १९ फेब्रुवारी रोजी सेवा केंद्रातून भव्य दिव्य शिव विचार पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मराठी संस्कृती, शिवरायांच्या शौर्य गाथा, गड किल्ले माहिती देणारे उपक्रम यांचा पालखी सोहळ्यात सहभाग असणार आहे. बजाजनगर सेवा केंद्रातून निघालेली पालखी शिवस्मारक ठिकाणी येऊन व्याख्यान तथा मार्गदर्शन होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे. 

बजाजनगर परीसरातील सर्व भाविक सेवेकऱ्यांनी सदरील ऐतिहासिक क्षणांमध्ये सहभागी होऊन शिव विचारांचा जागर घराघरात पोहचवण्याचे आवाहन नियोजन प्रतिनिधी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close